Maharashtra Excise Department Bharti 2025: सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी आहे. Maharashtra Excise Department Bharti 2025 म्हणजेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल 1223 पदांसाठी मेगाभरती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आता प्रश्न असा आहे की, इतकी मोठी भरती का होत आहे? आणि ही संधी इतकी विशेष का आहे? तर मित्रांनो याचं उत्तर फार सोपं आहे, गेल्या काही वर्षांत या विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं अशीच पडून आहेत, ज्यामुळे प्रशासनाचं दैनंदिन कामकाज, विशेषतः मद्यविक्री, अवैध वाहतूक आणि महसुली कारवाई यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने हे गांभीर्य लक्षात घेत मोठा निर्णय घेतला असून, नवीन आकृतीबंधास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे विभागात नवीन भरती होईल आणि सोबतच बेरोजगार तरुणांना सरकारी सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे.
सरकारचा ठोस निर्णय, 1223 पदांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत, उत्पादन शुल्क विभागातील कमकुवततेवर उपाय म्हणून, 744 नवीन पदांची निर्मिती आणि 479 पर्यवेक्षीय पदांचा समावेश करण्यात आला असल्याचं दिसून येत आहे. एकूण 1223 पदांसाठी सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली असून लवकरच भरती (Excise Department Vacancy) प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिक्त पदांचा भार आणि त्याचे परिणाम
सध्या विभागामध्ये उपअधीक्षक, जवान, वाहनचालक, लिपिक, टंकलेखक आणि लेखापाल यांसारखी अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात, आणि हेच विभागाच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करत आहे. विभाग जिथे राज्याच्या महसुलाचा एक मोठा वाटा उभारतो, तिथे ही रिक्तता निश्चितच चिंतेची बाब होती. मात्र आता या भरतीच्या रूपात एक आशेचा किरण दिसून येत आहे.
विभागाचं महत्त्व का आहे?
उत्पादन शुल्क विभाग हे राज्य शासनाचं एक अत्यंत महत्त्वाचं आर्थिक स्त्रोत आहे. या विभागाचे कार्यक्षेत्र बघितलं तर, मद्य विक्री, खरेदी, वाहतूक आणि उत्पादन यावर नियंत्रण ठेवणे, अवैध मद्य निर्मिती, साठा, वाहतूक आणि विक्रीवर कारवाई ही आहे. तरी केवळ नाशिक विभागातूनच हा विभाग दरवर्षी 4000 कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा करतो म्हणूनच या विभागाचं बळकट असणं राज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
गट ‘क’ मधील पदांची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासा
जवान, लिपिक, वाहनचालक आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक ही पदं देखील बराच काळ रिक्त आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी दुय्यम निरीक्षक अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण भरती रखडल्यामुळे त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. आता ही भरती नव्याने सुरू होणार असल्यामुळे त्या स्वप्नांना नवी उमेद देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवलेली मागणी, पुढे काय?
उत्पादन शुल्क विभागाने 137 दुय्यम निरीक्षक पदांसाठी (Maharashtra Government Job) गृह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवलं आहे. मात्र, अद्याप त्यावर आयोगाकडून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. अभ्यासक्रम, परीक्षा वेळापत्रक याबद्दल अजून तरी अनिश्चितता दिसून येत आहे. तरीही, आता आकृतीबंध मंजूर झाल्यामुळे लवकरच सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी काय संधी?
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही भरती एक उत्तम संधी ठरू शकणार आहे. या भरतीमुळे केवळ नव्या उमेदवारांना संधी मिळणार नाही, तर विभागाची कामगिरी अधिक प्रभावी देखील होणार आहे. यासोबतच नियमित तपासणी, कारवाई आणि महसूलवाढ यामध्ये देखील भरभराट होत असल्याचं बघायला मिळेल.
महत्वाची सूचना: भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात (Excise Bharti News) प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारांनी ती नीट वाचूनच अर्ज करावा. अटी, नियम आणि आवश्यक पात्रता पूर्ण समजून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही चूक टाळावी आणि योग्य त्या तारखा व प्रक्रियेचं पालन अवश्य करावं.