MPSC Pashusanvardhan Vibhag: एमपीएससीकडून २७९५ पदांची भरती, पदवीधरांना मोठी संधी!

MPSC Pashusanvardhan Vibhag: नमस्कार मित्रांनो, सध्या एका मोठ्या बातमीने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आशेचा किरण फुलवला आहे. एमपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर भरतीची जाहिरात निघाली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत तब्बल २७९५ पदांसाठी भरती (MPSC Bharti 2025) करण्यात येणार असून, ही संधी शेतकरी कुटुंबातील तसेच ग्रामीण भागातील सगळ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

पशुसंवर्धन विभागातील कामावर परिणाम, मंत्री पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय

पशुसंवर्धन विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पदे (MPSC Latest Recruitment 2025) रिक्त होती. त्यामुळे विभागाचं काम थांबत होतं आणि शेवटी या साऱ्याचा फटका थेट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देखील बसत होता. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) २७९५ पदे भरतीसाठी मागणीपत्र सादर केलं आहे.

या भरतीमुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना दिलासा मिळणार

सध्या पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदं मंजूर आहेत. त्यापैकी फक्त १८८६ पदं भरलेली असून, उर्वरित २७९८ पदं रिक्त आहेत. शिवाय २०२५ अखेर आणखी ८ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. या रिक्त जागांमुळे ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा थांबण्याच्या मार्गावर होत्या. मात्र आता ही भरती झाल्यावर या सेवा अधिक गतिमान होतील आणि शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळेल.

भरती प्रक्रिया आणि पात्रता

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना एमपीएससीच्या (Maharashtra Government Jobs 2025) अधिकृत संकेतस्थळावर (https://mpsc.gov.in/) जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख १८ मे २०२५ आहे.​

  • पात्रता: पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसंवर्धन पदवी आवश्यक आहे.​
  • गट: गट अ​
  • पद: पशुधन विकास अधिकारी​ (Livestock Development Officer – LDO)
  • अर्जाची अंतिम तारीख: १८ मे २०२५

सततच्या अभ्यासात, स्पर्धेच्या गर्दीत आणि संधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे. ग्रामीण भागातील मुलामुलींना रोजगाराच्या नव्या संधीची ही सुरुवात ठरू शकते. शासनाकडून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती नीट तपासून भरावी.​
  • अर्जाची प्रिंटआउट घेऊन भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावी.​
  • अर्जाच्या प्रक्रियेतील कोणत्याही अडचणीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.​

ही भरती फक्त नोकरीपुरती मर्यादित नाही, तर ही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी एक पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे की, या भरतीमुळे ग्रामीण भागातील जनावरांच्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढणार असून शेतकऱ्यांचा आधारभूत आर्थिक स्रोत अधिक सक्षम होणार आहे.